Top Post Ad

मंदिर परिसरातील गोमातांवर पोलिस प्रशासनाची कारवाई... गोसेविका महिलांनी व्यक्त केला तीव्र संताप

मुंबई शहरातील विविध मंदिरांसमोर पूजेसाठी ठेवण्यात येणाऱ्या गोमातांवर पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या गोसेविका महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी भटक्या व विमुक्त जाती संघ, मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी केली. याबाबत अधिक माहिती देण्याकरिता आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक गोसेविकासह   भटक्या व विमुक्त जाती संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा शिंदे, अध्यक्षा कल्पना चव्हाण, किशोर शिंदे, सुरेश साळुंखे, सौ. नंदा शिंदे, रेखा शिंदे, दयानंद शिंदे आदी उपस्थित होते.

 यावेळी भोसले यांनी सांगितले की, मुंबईतील मलबार हिल, नाना चौक, ग्रँट रोड, चिराबाजार, गावदेवी पोलीस ठाणे परिसर, व्ही.टी., एल.टी. मार्ग, कुलाबा, मुंबई सेंट्रल आदी भागांतील मंदिरांसमोर पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या सुमारे शंभर गाईंवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत प्रत्येकी १,२५० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून काही ठिकाणी गाईंना ताब्यात घेण्यात आले आहे.  नाथपंथी डवरी गोसावी समाजातील गोसेविका माता-भगिनी अनेक वर्षांपासून मंदिरांमध्ये भक्तांना पूजेसाठी गाई उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेत. भक्तांकडून मिळणाऱ्या दानावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अलीकडे सुरू झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे भोसले यांनी सांगितले.

या कारवाईविरोधात यापूर्वी २५ मार्च २०१६ रोजी गोसेविका महिलांनी मुंबईतील आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा (राज्यमंत्री दर्जा) यांनी ३१ एप्रिल २०१६ रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात गोसेविका महिलांची बैठक घेतली होती. या बैठकीत मंदिर परिसरातील गाईंना कायदेशीर संरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

या गाईंमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते. तसेच रस्त्यावर मोकाट जनावरांना बंदी असल्याचे कारण देत पोलिस प्रशासन यावर कारवाई करीत आहे. मात्र ही कारवाई काही ठराविक परिसरातच का असा प्रश्नही भोसले यांनी उपस्थित  केला. गाईमुळे परिसरात अस्वच्छता कशी निर्माण होऊ शकते कारण गाईचे गोमूत्र हे सर्वात पवित्र आणि शेण देखील बहु-उपयोगी आहे. हे आयुर्वेदात स्पष्ट केले आहे. हिंदू धर्मात गाईला पवित्र स्थान आहे. मंदिर परिसरात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गाईंवर कारवाई करणे दुर्दैवी आहे. शासनाने या धार्मिक परंपरेचा विचार करून मंदिर परिसरातील गाईंना कायदेशीर संरक्षण द्यावे, संपूर्ण दिवसभर बसण्याची परवानगी आम्ही मागत नाही तर सकाळच्या वेळी केवळ चार तास बसण्याची तरी परवानगी शासनाने द्यावी. 
या प्रकरणी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गोसेविका महिलांना न्याय द्यावा ” अशी मागणी मच्छिंद्र भोसले यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com