CSMT–कोल्हापूर–CSMT विशेष (01039/01040)
LTT–नांदेड–LTT विशेष (01041/01042)
पनवेल–अमरावती–पनवेल अनारक्षित विशेष (01415/01416)
यापैकी CSMT–कोल्हापूर विशेष गाड्या थेट CSMT वरून चालवणे अत्यंत चुकीचे आहे.
या गाड्या CSMT ऐवजी कल्याण किंवा पनवेल येथून चालवणे पूर्णपणे शक्य व आवश्यक आहे.
लोकल गाड्यांचा प्रचंड उशीर, त्यामुळे वाढणारी बेकाबू गर्दी, ट्रॅकची अनुपलब्धता या सर्व बाबी लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या लोकल ट्रॅकवरून चालवल्यामुळे मुंबई लोकलच्या अपघातांत वाढ होत आहे. Tracks 1 ते 4 : लोकल ट्रेनसाठी, Tracks 5 व 6 : मेल/एक्सप्रेससाठी असे असतानाही, रात्री अपरात्री ५-६ ट्रॅक रिकामे असतानाही ३-४ ट्रॅकवरून एक्सप्रेस चालवल्या जातात, यामुळे ट्रॅक मेंटेनन्स होत नाही. सकाळी लोकल गाड्या खोळंबतात, प्रवाशांचे मृत्यू होतात. हे वास्तव स्वीकारणे गरजेचे असून त्यावर ठोस उपाययोजना करण्यापेक्षा रेल्वे प्रशासन जाणिवपूर्वक याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप प्रवाशी संघाने केला आहे. आज CSMT / चर्चगेट परिसरात राहणारा मध्यम व उच्च मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाला आहे, कारण: घरांचे दर 1.5 ते 2 कोटींपेक्षा अधिक स्वतःची वाहने (Cars) उपलब्ध, खरे लांब पल्ल्याचे रेल्वे प्रवासी आज ठाणे, कल्याण, पनवेल, वाशी, वसई परिसरात राहतात. म्हणूनच सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या CSMT व चर्चगेट येथे आणणे अन्यायकारक व धोकादायक असल्याचे प्रवाशी संघाचे म्हणणे आहे.
1. मुंबईमध्ये मेल-एक्सप्रेस गाड्या वाढवण्याऐवजी लोकल गाड्यांच्या फेऱ्या तात्काळ वाढवाव्यात
2. CSMT व चर्चगेट येथून कोणत्याही नवीन मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू करू नयेत
3. CSMT–कोल्हापूर विशेष गाड्या तात्काळ कल्याण किंवा पनवेल येथून चालवाव्यात
4. Tracks 1 ते 4 कायमस्वरूपी फक्त लोकल ट्रेनसाठी राखीव ठेवावेत
5. गरज असल्यास दक्षिण भारताकडे जाणाऱ्या काही मेल-एक्सप्रेस रद्द/कमी करून त्या क्षमतेत मुंबई लोकल वाढवाव्यात
6. किती नवीन लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, याची स्पष्ट व लेखी माहिती सार्वजनिक करावी
जर हा निर्णय महाराष्ट्राबाहेरील खासदारांच्या दबावाखाली परत घेतला गेला, तर मुंबई लोकल पुन्हा कोलमडेल, गर्दी वाढेल, मुंबईकरांचे मृत्यू वाढतील. ही बाब राजकीय नसून मुंबईकरांच्या जीवन-मरणाची आहे. मुंबई लोकल, मुंबईची लाईफलाईन आहे. तिच्याशी कोणतीही तडजोड करू नका असे आवाहन मुंबई रेल प्रवासी संघाने मुंबई रेल प्रवासी संघ रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधी व सर्व नागरिकांना केले आहे. .

0 टिप्पण्या