Top Post Ad

कुलगुरूंना पाली भवनबाबत इतका तिरस्कार का? पाली संवर्धन समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा

 300 हून अधिक विद्यार्थी असलेल्या पाली भाषा विभागासाठी स्वतंत्र जमीन देऊन पाली भवन उभारण्यात यावे. या प्रमुख मागणीकरिता भंते विमांसा हे २० ऑगस्ट २०२५ पासून पाच महिन्यांहून अधिक काळ मुंबई विद्यापीठाच्या कालीना संकुलात बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. मात्र इतका दीर्घ कालावधी उलटूनही विद्यापीठाचे कुलगुरू भंते विमांसा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यास तयार नाहीत. त्यामुळे कुलगुरूंना पाली भवनबाबत इतका तिरस्कार का असा संतप्त सवाल पाली संवर्धन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला. हा उघड जातीवाद असून रोहीत वेमुल्ला आणि पायल तडवी यांच्याप्रमाणे उद्या भन्ते विमांसा यांच्या जीवाला देखील धोका असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com