Top Post Ad

फक्त जागरूकता, योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि धाडसाची गरज

 सुमारे 10 तास त्याचे आई-वडील भीतीच्या छायेत बसले होते, "Digital Arrest" च्या नावाखाली त्यांना धमकावलं जात होतं आणि पूर्णपणे ताब्यात ठेवलं जात होतं.फसवणूक करणारे स्वतःला अधिकारी असल्याचं सांगत, त्यांच्यावर दहशतवादाशी संबंधित खोटे आरोप केले, video call वर बनावट वॉरंट दाखवत राहिले आणि त्यांना सतत जोडलेलं राहण्यासाठी भाग पाडलं; ना कोणता प्रश्न, ना कोणती हालचाल, ना कोणता बचाव. भीती इतकी वाढली की विचार करण्याची ताकदच संपून गेली.पण त्यांचा मुलगा ते पाहू शकत होता, जे त्यांना दिसत नव्हतं.

बरेलीतील इयत्ता 8 वीतील या विद्यार्थ्याला लगेच जाणवलं की काहीतरी चुकीचं आहे: बोलण्यातल्या विसंगती, विचित्र दबाव आणि bank details मागण्याची घाई. त्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण भीतीने आधीच मनात घर केलं होतं.तेव्हा त्याने एक छोटं, पण अत्यंत परिणामकारक पाऊल उचललं.त्याने शांतपणे फोन उचलला आणि तो Flight Mode वर टाकला. त्याच क्षणी क्षणी कॉल कट झाला. फसवणाऱ्यांचा सारा डाव कोसळला. आणि हजारो रुपये लुटण्यापासून वाचले.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा फसवणाऱ्यांनी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा यावेळी फोन पोलिसांनी उचलला. कधी कधी भीतीचं जाळं तोडण्यासाठी कोणत्याही “अधिकाराची” गरज नसते, तर फक्त जागरूकता, योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि धाडसाची गरज असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com