Top Post Ad

भूमिपुत्राला हक्काचे घर देणे हे सरकारचे कर्तव्य - भाई जगदिशकुमार इंगळे

 मुंबईतील विखुरलेल्या भाडेकरूंना म्हाडाच्या पुनर्विकास योजनेत सामावून घेऊन  सवलतीच्या दरात घरे उपलब्ध करून देण्यात यावी. मुंबईतील मराठी माणूस आणि इथल्या भूमिपुत्राला हक्काचे घर मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तरी, आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने प्रशासकीय यंत्रणेला निर्देश द्यावेत अशी मागणी मुंबई भाडेकरू रहिवाशी महासंघाच्या वतीने आज करण्यात आली.  मुंबई भाडेकरू रहिवाशी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिशकुमार इंगळे, प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे,  वनिता कांबळे (जिल्हाध्यक्ष), वनिता निकाळजे (जिल्हा सचिव) आणि संकल्पना कांबळे (कोषाध्यक्ष) यांच्यासह अनेक भाडेकरूं उपस्थित होते.


प्रसारमाध्यमांशी बोलताना इंगळे म्हणाले, मुंबई शहरात गेल्या अनेक पिढ्यांपासून जुन्या चाळी, इमारती आणि झोपडपट्टीसदृश गस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने भाडेकरू राहत आहेत. पुनर्विकासाच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी विखुरलेले, वैयक्तिक घरमालकांकडे राहणारे भाडेकरू मात्र योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे मराठी भूमिपुत्र बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा शासनाने याचा विचार करून याबाबत तात्काळ विचार करावा.

यावेळी इंगळे यांनी सांगितले की, “कोणीही बेघर राहणार नाही” हा सरकारचा उद्देश असला तरी प्रत्यक्षात अनेक भाडेकरू पुनर्विकास योजनांपासून वंचित राहिले आहेत. मुंबईतील जुन्या चाळी, इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये पिढ्यान्पिढ्या राहणारे भाडेकरू पुनर्वसन प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याने स्थानिक भूमिपुत्र बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे. महासंघाने २०२४ ते २०२९ या कालावधीत सर्व पात्र भाडेकरूंना घरे देण्याची मागणी केली आहे. यासाठी मुलुंड तहसील, भांडुप ‘एस’ वॉर्ड आणि वांद्रे कलेक्टर कार्यालय परिसरात सर्वेक्षण राबविण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांकडे निवेदन सादर केल्याची माहितीही देण्यात आली.

 म्हाडा व SRA च्या पुनर्विकास योजनांमध्ये विखुरलेल्या भाडेकरूंना स्वतंत्र घटक म्हणून समाविष्ट करावे.   पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी किमान २०% सदनिका अशा भाडेकरूंसाठी राखीव ठेवाव्यात.  हे भाडेकरू आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटातील (LUG) असल्याने, त्यांना अत्यल्प दरात आणि सरकारी अनुदानासह (Subsidy) घरे उपलब्ध करून द्यावीत. केवळ भाडे पावती, रहिवासी दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्यावर आधारित त्यांची पात्रता निश्चित करून नोंदणी प्रक्रिया सोपी करावी. म्हाडा आणि इतर गृहनिर्माण संस्थांना अशा विखुरलेल्या भाडेकरूंचे सर्वेक्षण करून त्यांना योजनेत सामावून घेण्याबाबत तातडीने आदेशित करावे. या  प्रमुख मागण्या यावेळी संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ८ मे  पासून आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा जगदीश इंगळे यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com